

वर्धा : क्षुल्लक वादातून एका युवतीची हत्या करण्यात आल्याची घटना रात्रीच्या सुमाराम सुलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोन मुली आणि दोन मुलांना ताब्यात घतले आहे.
रात्रीची वेळ असल्याने सदर मुलगी घरात कामे करीत होती. याच सुमारास ताब्यात घेण्यात आलेल्या दोन मुलींनी तिला हाक दिली. बाहेर येताच मागून आलेल्या दोन युवकांनी तिच्या मानेवर चाकूने वार केला. यात ती गंभीर जखमी झाल्याने तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर चौघांनोही गावातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले यापूर्वी हिंगणघाट येथे एका प्राघ्यापिकेला एकतफी प्रेमातून पेटवून देण्यात आले होते. राज्यभरात ही घटना घढली होती. आता घरत शिरून एका युवतीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.