

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील साथी येथील शेतकरी संभाजी टेंभेकर यांच्या शेतशिवारातील शेतात बांधुन असलेल्या बैलजोडीवर शनिवारी (ता.२५) झालेल्या रात्रीच्या मुसळधार पावसात वीज पडुन जागीच बैल ठार झाल्याची घटना रविवारी (ता.२६) सकाळी उघडकीस आली.
हंगामाच्या तोंडावर पावसाने प्रचंड नुकसानीचा सामना करीत असलेल्या या शेतकर्यावर अस्मानी संकटाने दोहेरी आघात केल्याने जबर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने ताबडतोब आर्थिक मदत करुन शेतकर्याला सावरण्याचा प्रयत्न करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.